Sunday, January 13, 2019

आठवणी

मनातील भावना लिहिताना विचारांचा कहर होतो
कल्पनेच्या झाडाला मग शब्दांचा बहर येतो

भावनांना समुद्रातील लाटांप्रमाणे उधाण येतं
विचारांच्या फेसाळणाऱ्या दर्यात मन कसं वाहून जातं

प्रत्येक लाटेतुन शब्द जणू येऊन भेट घेतात 
जाता जाता काव्यरुपी ओळी देऊन जातात

आनंदाचे दिवस सारे डोळ्यातून अश्रू येतात   
विचार करता "त्या" आठवणी अलगद जाग्या होतात 

No comments:

Post a Comment