मनातील भावना लिहिताना विचारांचा कहर होतो
कल्पनेच्या झाडाला मग शब्दांचा बहर येतो
भावनांना समुद्रातील लाटांप्रमाणे उधाण येतं
विचारांच्या फेसाळणाऱ्या दर्यात मन कसं वाहून जातं
प्रत्येक लाटेतुन शब्द जणू येऊन भेट घेतात
जाता जाता काव्यरुपी ओळी देऊन जातात
आनंदाचे दिवस सारे डोळ्यातून अश्रू येतात
विचार करता "त्या" आठवणी अलगद जाग्या होतात
No comments:
Post a Comment