Saturday, August 29, 2015

एक बहिण असावी..























लहानपणी वाटे,
एक बहिण असावी..
एक गोळी तीला
चिमणीच्या दाताने
तोडून द्यावी,
उरलेली अर्धीही तीलाचं
द्यावी..
एक बहिण असावी..
पाठीशी तीला घालताना
आईची बोलणी खावी,
नंतर मात्र तीलाचं एक ठेऊन
द्यावी..
एक बहिण असावी..
चीडवायला तीला फार
मजा यावी,
पण रडू ती लागताचं
जिवाची घालमेल व्हावी..
एक बहिण असावी..
पहिल्या माझ्या पगारात
तीला छान गिफ्ट आणावी,
आणि गिफ्ट हातात पडताचं तिने
वर पार्टीही उकळावी..
एक बहिण असावी..
असेचं आणि बरेचं नेहमी मला वाटे,
एक बहिण असावी..
पण ?????
मला बहिण का नसावी ?
त्यामुळे भाऊबीज माझी सूनीसुनी जावी..
आणि अचानक
आयुष्यात माझ्या एक
छोटुकली यावी..
सख्खी नसेल तरीही सख्ख्याहून
सख्खी वाटावी..
एक बहिण यावी..
तीच्याशी बोलताना माझीसुःख
दुःखे सांगावी,
सांगता सांगता तीचीही जाणून
घ्यावी..
खरचं घर मुलींशिवाय अपूर्ण
असतं...!!!!.
सर्वांना राखी पौर्णिमेच्या लाख लाख
शुभेच्छा...

Friday, August 28, 2015

एका बहिणीच्या जन्माचे सार्थक झाले..

बालपणी कित्येक क्षुल्लक कारणांवरून भांडलो होते..
कधी तुझी खेळणी.. कधी माझी भातुकली..
रिमोट कंट्रोलची खेचा खेची.. टीवी चॅनेल साठी ..
आत्ता ते सारं पोरकट जरी वाटलं तरी..
तेव्हा जीवन मरणाचा प्रश्न होता..

मग एक दिवस ..
ख़री खुरी भातुकली खेळायला सज्ज उभी मी
आंतरपाटा पलिकडच्या विश्वात गेले..
कोणीतरी तुला कान पिळायला बोलावले..
कुठुनसा तू आलास.. डोळे तुझे लाल..
पेटवलेल्या होमाचा धूर- मला वाटले..
सारं जग रडेल.. पण तू नाही ढाळणार अश्रु..
सोडशील नि:श्वास आणि हसशील मनात..
म्हटलं -
आता बस घेऊन रिमोट- चोविस तास हातात..
मी निघाले माझ्या घरी ..
हक्काचा रिमोट माझ्या हातात असेल..
आईच्या कुशीत शिरत मग रड रड रडले..
पप्पांचे हात तेव्हा डोक्यावरून फ़िरले..
तुला म्हणाले.. 'निघते रे'..
आणि मग ..
तू हमसा हमशी रडत मला बिलगलास..
म्हणत राहीलास.. फक्त..
"भाओजी.. माझ्या दिदीची काळजी घ्याल ना.. "
"भाओजी.. माझ्या दिदीची काळजी घ्याल ना.. "
मी अवाक.. नि:शब्द.. !!!
रडताना तुला पहिल्यांदाच पाहिले..
माझ्यावरचे प्रेम तुझ्या डोळ्यातून वाहिले..
भरून पावले अगदी..तशातही मनात सुखावले...
म्हणाले मनातच... चला..
एका बहिणीच्या जन्माचे सार्थक झाले..
एका बहिणीच्या जन्माचे सार्थक झाले..

यालाच म्हणतात का प्रेम....?

यालाच म्हणतात का प्रेम....? तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा, आणि फक्त तिच्या अस्तित्वानेच खुलनारी प्रत्येक दिशा, यालाच म्हणतात का प्रेम....?
तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल, आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल, यालाच म्हणतात का प्रेम....?
तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास, आणि तिने वेड्या गप रे म्हणाव असा मलाप्रत्येक क्षणी होणारा भास, यालाच म्हणतात का प्रेम....?
तिच्या आठवणीने माझा कासाविस होणारा जीव, आणि सर्वापेक्षा जास्त प्रेम करूनही तिला न येणारी माझी किव, यालाच म्हणतात का प्रेम....?
तिला जाणीव पण न होता माझ्या प्रेमाचाझालेला तिला स्पर्श, आणि हे सर्व वाचून, तिच्या नाजुक ओठावर आलेल्या हास्याचावेड्या अक्षयला झालेला हर्ष, कदाचीत यालाच म्हणत असतील प्रेम....!"

आयुष्यात इतकी येईल कडकी

चार दिसाच प्रेम माझ तिला झाल माझ ओझ सोडुन गेली मला ती शेवटी वाटेवर एकटी मला नव्हत कधी माहिती आयुष्यात इतकी येईल कडकी हो येल विश्वास तिच्यावर माझा साद देईल मनोमिलनाचा कार्यक्रम होईल तेव्हा मी नसेन आयुष्यातुन मी निघुन जाईल

तीने प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव

मी ही प्रेम केलेलं तिच्यावर पण तिला नाही ते जाणवलं तीने प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव दिल
म्हनाली ..... मित्र राहीलास तर आयुष्यभर पण प्रेम करणार संकटाच्या वेळी साथ देईन पण संसार नाही करणार

इतके प्रेम तुझ्यावर करायचे आहे

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि 
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरीकमी आहे...!!
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचे आहे की 
आयुष्याला हि वाटावे की आयुष्य किती कमीआहे......!!

प्रेमात पडण म्हणजे काय ?

प्रेमात पडण म्हणजे काय ? प्रेमात पडण म्हणजे काय ? दोन जीवांना लागलेली ओढ की पुन्हा पुन्हा भेटण्याचे वेड दोन देहांचे मधुरमिलन की एकरूप झालेली स्पंदन प्रेम म्हणजे देणगी दैवी प्रेम म्हणजे राग भैरवी प्रेम म्हणजे भेट अमुल्य प्रेम म्हणजे अनुभूती अतुल्य प्रेमात पडलेल पाहून लोक हसतीलही जणू काय प्रेमात नव्हे खड्ड्यात पाडल्यासारख प्रेमात पडलेल पाहून लोक फसतीलही जणू काय प्रेमात नव्हे अड्ड्यात हरल्यासारख हाच बोयफ्रेंड मिळावा म्हणून काहीजणी बाप्पाला नवस बोलतात हीच गर्लफ्रेंड मिळावी म्हणून दीडशहाणे शिकवणी घेत बसतात प्रेम काही बाजारात नाही मिळत विकत आणि जरी मिळाल तरी जास्त नाही टिकत त्यात काय विशेष प्रेम तर पशुपाक्ष्यांनाही होत हेच तर विशेष आहे प्रेम चराचरांत स्थित आहे प्रेमात पडण म्हणजे काय ? दोन जीवांचा जिव्हाळा की एकमेकांना लागलेला लळा दोन मनांचा संगम की स्वप्नसृष्टी विहंगम .

पहिली नजर

पहिली नजर कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पांच्या गठ्ठ्यावर दंगला होता मित्रांचा ग्रूप रमत नव्हते मन माझे उमगत नव्हते काय करावे कुणास ठाऊक काय शोधत होते वाट कुणाची बघत होते. लेवुनी रूप नवेनवे आले कुठून फुलपाखरू पहिली नजर नजरेला भिडली प्रीतस्पंदने अजूनच आवेगली मनातल्या मनात म्हटले मन वाह! किती सुंदर रूप, किती सुंदर तन जीभ मात्र राहिली चूप हर्षले मन आनंदले खूप. आधी ना घडले कधी उचंबळले ना काळीज कधी पहिल्या पावसाचा पहिलाच थेंब पहिल्या नजरेतल पहिलच प्रेम. गंधित झाला स्वैर वारा रंगीत झाल्या टिमटिम तारा बरसल्या रिमझिम श्रावणधारा पहिल्या नजरेचा पहिला इशारा.

Thursday, August 27, 2015

जगनं माझ तुझ्या हाती

ही वेळ ही कमी पड़तेय रे तुझ्यावर
प्रेम करण्यासाठी 
म्हणून सतत मागतोय तुला
देवाकडे आयुष्यभरासाठी

नाही रे प्रेम करत तुझ्यावर
फक्त आणि फक्त इच्छे साठी 
तूच योग्य आहे
हे सुंदर जीवन आनंदीत जगन्यासाठी

काय करू सांग
ना वेडी तुझ्यासाठी कारण
आहे जगनं माझ तुझ्या हाती 

होशील ना माझी आयुष्यभरासाठी
कारण मला आयुष्य वहायच आहे तुझ्या चरणी
जगले तर तुझ्यासाठी नाही 
म्हणालीस तर तयार आहे मी हे जग सोडण्यासाठी

सार काही तिच्यासाठी

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी मग का तिच्यासाठी झुरतो ?
कळत नाही तुला त्रास मला भोगावा लागतो आश्रूं मधे भिजून भिजून रात्र मी जागतो.
मी म्हटले मनाला का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू का असा दुखात राहतो ?
मन म्हणाले प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा आपण स्वता ला विसरतो सार काही तिच्यासाठी ईतकेच मनाला समजावतो......

तू कधी ना कधी परत येशील.......

तुझा Responce मिळणार नाही हे माहीत असूनही मी मात्र तुझ्यावर प्रेम केले... त्यात माझे काय चुकले ????
कारण..." I Love you " हा माझ्यासाठी प्रश्न नव्हता,
ज्याचे तू मला उत्तर द्यावे, त्या माझ्या Feelings होत्या, आणि त्या तु कधीच समजून नाही घेतल्या...
त्यात तुझे काही चुकले असे ही मी म्हणत नाही, पण... ' माझे काय चुकले ' हे तरी मला सांग.
अजून ही तुझी वाट पाहते या वेड्या आशेने की तू कधी ना कधी परत येशील.......

किती त्रास झाला गं या जीवाला

ठोका या माझ्या हृदयाचा, तुझ्याचसाठी गं राणी धडधडला..
जीव माझा तुझ्यावर मी लावीला, तु मात्र मलाच वेडा ठरविला..!!
ये गं ये राणी तु भेटायला, नाहीतर कसं करमेल या प्रेमवेड्याला..
वाट तुझी बघुनी झालो रडवेला, पापणीत बंद केलं मी वादळाला..!!
आता धीर नाही गं मनाला, सांग सावरु किती मी स्वतःला..
काहीच का गं वाटेना तुला, किती त्रास झाला गं या जीवाला...!!!

Wednesday, August 26, 2015

नाजुकसे हे मन माझे, त्यात वसले प्रेम तुझे

नाजुकसे हे मन माझे, त्यात वसले प्रेम तुझे..
तुझ्याच स्वप्नात कटले, रात्र अनं दिवस माझे..!!
हसतं मन मनात कधी, आठवणींना त्या आठवून..
जपतोय तुझ्या प्रेमाचे, ते प्रत्येक क्षण साठवून..!!
अगं तुही आठव जरा, तो प्रेमाचा गोड वारा.. हवाहवासा वाटतो ना, परत तो थंडीचा गारवा..!!
इथेच तू रोज भेटायची, माझ्यासोबत हसायची.. तासंतास मिठीत घेऊन, गोड गोड तू बोलायची..!!
काहीवेळ जरी दुरावले, प्रेमफुल नाही सोकावले... दिल्या घेतल्या वचनांना, प्रेमाने दोघांनी जोपासले

प्रेमात पडलं की असच व्हायचं !!


प्रेमात पडलं की असच व्हायचं !!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं जवळपास नसूनही जवळ असणं;
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं; अचानक स्वप्नात दिसणं ! माझं काय, तुमचं काय
डावा हात होता की उजवा हात होता?
प्रेमात पडलं की असच व्हायचं !! केसांची बट तिने हळूच मागं सारली ... आपण सारखं आठवतो, प्रत्येक क्षण,
आपण सारखं आठवतो,
मनात आपल्या साठवतो ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?

शब्दा वाचून तिला सगळ काही कळते

शब्दा वाचून तिला सगळ काही कळते ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं होता... विचारू का? तो: permission काय घेतेस... विचार जे विचारायच्या ते... ती: तू रोज कविता का करतोस? तो: मनातल सगळ सांगण्यासाठी... ती: मग कवितेत का रडतोस? तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी... ती: कशी सुचते रे कविता तुला ? कसे सुचतात रे शब्द ? भिडते रे मनाला कविता तूझी, अन वाचून होते, मी रे स्तब्ध... तो: कशी सुचते ते मला माहित नाही, पण लिहितो मी काही तरी... शब्द नसतात ग त्यात, रचत मी भावनांची रांगोळी ...

Tuesday, August 25, 2015

हेच तर प्रेम असतं ..

खरचं ........... प्रेम म्हणजे काय असतं ?...
तिच्या डोळ्यांतील अश्रु जेव्हा ......... आपल्या डोळ्यांतुन ओघळतातं .... ते प्रेम असतं .......
तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा ..... तिच्या गालावरील खळीतुन खुलतं ..... ते प्रेम असतं .......
जेव्हा तिच्या आठवणीच ........ तुमचा श्वास बनतातं ....... ते प्रेम असतं ......
जेव्हा तिच्या येण्याची हलकीशी चाहूल ..... तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ..... ते प्रेम असतं .....
तिच्या काजळ डोळ्यांतील काळजी ..... नकळत सांगुन जाते की ...... या जगात आपलं हक्काचं कुणीतरी आहे ..... ते प्रेम असतं ......
जेथे शब्दांची गरज नसतेच कधी ...... एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो ..... न बोलताच भावना व्यक्त होतात ..... ते प्रेम असतं ......
विरहाचा प्रत्येक क्षण जेथे ...... युगांसमान भासतो ..... ते प्रेम असतं ......
चांदण्या रात्रीतील रेश्मी स्वप्नं ..... दोघांच्या पण डोळ्यांत जन्म घेतातं ..... काही हळुवार क्षणांना दोघंही जिवापाड जपतातं .... ते प्रेम असतं ......
जेथे असतात तिच्या नजरांचे तीक्ष्ण बाण ...... अन् त्यांच अचुक लक्ष्य असतात तुम्ही ..... हेच .......... हेच तर प्रेम असतं ......... !

माझी "ती" अशी असावी...

माझी "ती" अशी असावी माझी "ती" अशी असावी, जगात दूसरी तशी नसावी, मलाच सर्वस्व माननारी, माझी "ती" अशी असावी... प्रानजळ असावी, अवखळ असावी, परी ती अगदी सोज्वळ असावी, सर्वांना अगदी आपलं माननारी, माझी "ती" अशी असावी... फारच सुंदर, फारच गोरी, फारच देखणी पण नसावी, मजवर भरपूर प्रेम करणारी, माझी "ती" अशी असावी... आपली माणसं, आपलं घर, आपलेपणा जपणारी असावी, ससूलाही आई म्हणनारी, माझी "ती" अशी असावी... चाणाक्ष, हुशार, व्यवहारी, आयुष्यातील सल्लागार व्हावी, माझ्या चुका लक्षात घेणारी, माझी "ती" अशी असावी... माया, प्रेम आपुलकी, हे सर्व देणारी असावी, माझी "ती" अशी असावी... माझी "ती" अशी असावी...!!

प्रेम म्हणजे नक्की काय……. ?

"कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम … कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की … कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम …. कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की … आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम … कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की … कोणाच्या सहवासात … स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम … कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की …. कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम …. कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की …. कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम …. कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की …. न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम …. कोणासाठीतरी रडणारं मन म्हणजे प्रेम की …. कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम …. कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की … कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम … कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की …. आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम की …. कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम की …. कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम ….."

एकदा तरी मला तू, आपले मानून बघ

खूप प्रेम करतो तुझ्यावर, सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू, आपले मानून बघ. 

वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी, तू फक्त सांगून बघ,
आयुष्भर साथ देईन तुझी, एकदा आपले करून बघ.
तुझ्यासाठीच जगत आहे, तुझ्यावरच मरत आहे,
असला जरी नकार तुझा, तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे. 
वाटलेच कधी तुला तर, बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करतो, तुझ्यावर अगदी मनापासून.....!! घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी, 
माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन, मनापासून...फक्त तुझ्यासाठी....!!!!
पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे 'आकर्षण'असतं, परत पहावसं वाटणं हा'मोह'असतो, त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही'ओढ'असते, त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा'अनुभव' असतो, आणि त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं "प्रेम" असतं..

तुझ्यासाठी काहीतरी लिहावे वाटते

कळत नाही मला कसे शब्द उमटावे परंतु वाटते तुझ्यासाठी काहीतरी लिहावे…
तुझ्या पहिल्या भेटीपासून आठवते सर्व काही तुझ्या नाजूक-साजूक गोष्टी आणि अबोल दृश्य काही…

तुझ्या हसण्या-वागण्याने वेड लागले या मनाला तुझ्या मृदू-नाजूक स्वभावाचे बोल सांगेन मी या जगाला…
होत्या सर्व गोष्टी स्वप्नात उतरवल्यास तू त्या प्रत्यक्षात होते सर्व काही गंमतीत झाले त्याचे रुपांतर जंमतीत…
भरू दे सर्व सुख तुझ्या आयुष्यात आणि असाच बहरून राहा माझ्या जीवनात….

खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस

रोज काँलजेला जाताना, नजरेला नजर देतेस, मी डोळेभरुन पाहीलं की, नजर चोरत असतेस..... मी काही विचारलं की, अबोला धरुन बसतेस, मी जातो म्हटलो की, थांब ना जरा म्हणतेस..... खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस ???
रोज येता जाता वाटेवर, मला मध्येच अडवतेस, तुझ्याशी काही बोलयचयं म्हणत, बोलताना मध्येच अडखळतेस..... मी बोलायला लागलो की, तू फक्त माझ्याकडे पाहतेस, किती छान बोलतोस रे तू, म्हणुन माझं कौतुक करतेस..... खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस ???
काँलेजची सुट्टी झाली की, गेटवर माझी वाट पाहत थांबतेस, मी येताना दिसलो की, नजर दुसरीकडे वळवतेस.....
मी जवळ आलो की, जणू मुकीच होऊन जातेस, माझ्याशी बोलायच असतानाही, मुद्दाम गप्प गप्प राहतेस.....
खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस ???
मी फोन केला की, नंतर बोलू आपण सांगतेस, अन् थोड्या वेळातच Call करुन, खुप काही बडबडतेस..... मी फोन ठेवतो म्हटलो की, नकट्या रागाने Bye बोलतेस, प्लीज माझ्याशी बोल ना थोडं, म्हणुन तगादा लावतेस..... खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस ???
नेहमी माझ्या अवती भोवती, नको तेव्हा फिरकतेस, माझ्याशी बोलण्यासाठी, नको ते कारण शोधतेस..... मी खुप रागावलो की, डोळ्यात आश्रूं आणतेस, मी Sorry म्हटलो की, It's Ok रे होतं असं म्हणतेस.....
खरचं प्रेम करतेस का माझ्यावर, की फक्त मला मित्र मानतेस ???

विचारायचं तुला आज

विचारायचं तुला आज,
माझ्या मैत्रीच्या बंधनाला, आज तू तोडशील का ?
मैत्रीची सीमा झुगारून, पुढच पाऊल ठेवशील का?
खूप सारी मस्ती अन, खूप सारे रुसवे, माझे हे मन मात्र, मलाच आता का फसवे...
नाही म्हटलीस तरी, दोघांमध्ये आहे तितकीच ओढ, मग करुयाना प्रेमाच्या नात्याची, सुरवात अशी गोड...
पूर्वीचा आठवत बसलो कि, हसायला येत मला, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो हे, सांगू नाही तुला...
आतापरेंत प्रेमासाठी वाटत होता, मैत्रीचा आधार घेऊन तुला छळाव, आजही मी तुझ्यावरच प्रेम करतो, हे कुठून तरी तुला कळाव...
असं म्हणतात,प्रेम हे आंधळ असत, हे खरच असतं , तुझ्या प्रेमात पडल्यापासून, माझा फोन होईल का व्यस्त...
किती दिवस चालू ठेऊ मी, लपाछपी चा हा खेळ, आतातरी होऊदे आपल्या, दोघांच्या प्रेमाचा हा मेळ...
तुला याबद्दल सांगता येत नाहीये, असा सोडशील का हट्ट, आता मी तुला प्रपोज करतोय, हो म्हणून प्रेमाचं नातं कर आपलं घट्ट..

Monday, August 24, 2015

तुझं माझ्यावर प्रेमच नव्हतं...

तुझं माझ्यावर प्रेमच नव्हतं... हे मला सर्व समजत होतं..!
पण तुझ्या खोट्या प्रेमात... मी मनसोक्त वाहत होतो..!
हातात हात घेऊन तुझा, खुप फिरावसं वाटत होतं...
पण तुला मी आवडतच नव्हतो, हे मला कधीचं समजलं होतं..!
खर तर तुझी चुकी नव्हतीच गं, मीच कुठेतरी चुकलो होतो...
विरहात रडायची शिक्षा नको होती गं, मरणाच्या शिक्षेची मी अपेक्षा करत होतो..!
स्वप्नातला राजकुमार भेटला असेल गं तुला, 
पण तुलाच मी माझी स्वप्नपरी मानलं होत...!
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.. समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.. विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!
संकटकाळी हात देशील अडचणीत मदत घेशील -
चहाडी चुगली कानावर हात मैत्रीत नसते जातपात !
मैत्रीला लागत नाही कात्री असते मैत्रीत पक्की खात्री -
मित्रात जेव्हां अतूट मैत्री विश्वासाची पक्की खात्री !
उपकार होतील खूप तुझे देवा, एकच मागणे माझे -
एकच मित्र असा मिळावा कृष्ण-सुदामा आदर्श रहावा !

हरवलेली पाखरे

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला...
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.... एकत्र राहून खूप हसलो, खेळलो, शेवटच्या दिवशी मात्र रडलो....
पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव, कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव..
जगाच्या काना-कोपर्यात कुठेही जाऊ, एकमेकांना काही सेकंदासाठी आठवून पाहू.... खरच हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला....
पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो...
आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..
जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि ..........
पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि ........
रबराला एवढाही वापरू नका कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल 
आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, ज्या त्या काळजीसाठी पात्र आहेत......
कारण........प्रत्येकाला खूश ठेवायला आम्ही काही जोकर नाही......
मित्र बनून प्रियकर बनण सोप्पं..
प्रियकर बनून नवरा बनण हे सुद्धा सोप्पं..
कठिन असत ते
नवरा बनून प्रियकर रहाणं..
आणि
बायकोला मैत्रिणी सारखं समजुन घेणं हे जेव्हा आणि ज्याला जमत
त्या नवऱ्याला सुंदर दिसणाऱ्या मैत्रीणिची
आणि
बायकोला समजुन घेणाऱ्या मित्राची गरजच भासत नाही..

प्रेमात हरलात तरी जीवनात हरु नका

प्रेमात हरलात तरी जीवनात हरु नका,
प्रेमाशिवाय जगण्यात दुख: मानू नका.
सगलेच नसतात नशिबवान,
मरनानंतारही प्रेम मिलन्या इतके भाग्यवान.
कधी कुणाचे ‪#‎प्रेम‬ सोडून जाते,
कधी कुणी स्वतःच प्रेम करायचे विसरते.
स्वतःवर प्रेम करायला शिका,
स्वतःसाठी जगायला शिका.
शोधा जीवनात हरवलेले क्षण,
पुसून टाका दुःखाचे व्रण..
तेव्हा हसेल तुमचे मन,
भासेल सुंदर हे जीवन..

Sunday, August 23, 2015

बहिण

प्रत्येकाला एक बहिण असावी .
मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी पण एक बहिण असावी .
मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी ,
लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी .
मोठी असल्यास गुपचूप आपल्या पाॅकेट मध्ये पैसे ठेवणारी .
लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी .
लहान असो वा मोठी , छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी . एक बहिण प्रत्येकाला असावी .
मोठी असल्यास आपलं चुकल्यावर कान ओढणारी .
लहान असल्यास तिचं चुकल्यावर "साॅरी दादा "म्हणणारी.
लहान असो वा मोठी आपल्याला एक बहिण आसावी .
आपल्या एकाद्या मैत्रिणीला "वहिनी " म्हणून हाक मारणारी एक बहिण प्रत्येकाला असावी .
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी ,
लहान असल्यास प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चंदन लावणारी .
ओवाळणी काय टाकायची हे स्वतः ठरवत असली तरीही तितक्याच ओढीने राखी पसंत करून आणणारी . एक बहिण प्रत्येकाला असावी .
कठीण प्रसंगी खंबीर राहील स्त्री शक्तीच ती , स्वतःपेक्षा हि जास्त आपल्यावर प्रेम करणारी प्रत्येकाला एक बहिण असावी......!
आणि म्हणूनच मुलगी वाचवा देश वाचवा ।
ही पोस्ट शेअर करेल जो भाऊ बहिणीवर प्रेम करतो .
अन् जी बहिण भावावर जीवापेक्षा जास्त प्रेम करते ...

तुझ्या प्रेमात पडलोय

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़ अजुन ही तुला हे कसे कळत नाही तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही
कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर माझे मलाच ठाऊक नाही पण एवढे मात्र नक्की आहे की आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा तुझा आभासच अधिक सुखावतो मला तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
मनातले बोल ओठांवर येत नाही कधी तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते
तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी

प्रेमकथांची अखेर..

सगळ्या प्रेमकथांची सुरुवातगोड बोलण्यानंच होते

सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानंच होते!

सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं
पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!

'हात' एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठी
राजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच
एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
एकमेकांना झब्बू देण्यानं होते!

जे जे काही कळलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून
एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
छळून छळून छळण्यानं होते!

आपल्याला फक्त चुका दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे
चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे होणार नाही वाटतं
ते ते सारं घडत जातं

प्रेमकथेच्या शेवटी शेवटी
सारं सारं बिघडत जातं!
प्रेमात दोघं असतात तेंव्हा
प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा
प्रेमामधे एकमेकांबद्दल
एकमेकांच्या वागण्यामधे

प्रेम हे असच असत

प्रेम हे असच असत.... 
करताना ते कळत नसत
आणि केल्यावर ते उमगत नसत... 
उमगल तरी समजत...
नसत पण आपल 
वेड मन आपलच ऐकत नसत... 
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते. 

लोक म्हणतात काय असत प्रेमात .. 
पण मीम्हणतो करून बघा एकदा .. 
काय नसत प्रेमात ...? 
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..

दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो ... 
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते .... 
म्हणूनच प्रेम हे असच असत पण ते खूप खूप सुंदर असत

तुला प्रेम करणे जमलेच नाही

तुला प्रेम करणे जमलेच नाही आणि मला ते व्यक्त करणे मी वाट पाहिली तुझ्या येण्याची तुला वाट पाहणे जमलेच नाही आणि मला तुझ्या वाटेवर चालणे... मी खूप एकटा होतो तुझ्याविना तुला साथ देणे जमलेच नाही आणि मला तुझी साथ मागणे... मी गुंतत चाललो होतो तुझ्यात तुला हे गुंतणे समजलेच नाही आणि मला ते तुला समजावणे... मी प्रेमात पडलो खरा तुझ्या तुला या नात्याचा अर्थ कळलाच नाही आणि त्या नंतर मला या जगण्याचा.. कुणाला जाणीव ही नसते , कुणासाठी कुणीतरी झुरते, कळीला त्रास होऊ नये म्हणून , एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते , किती त्रास द्यावा एखाद्याला , यालाही काही प्रमाण असते , आपल्यावरूनच विचार करावा , समोरच्यालाही मन असते ....

Saturday, August 22, 2015

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर.......

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही...

सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..


डोळ्यातील पाणी सुकून जाते,
ओल्या जखमा मात्र काही केल्या सुकतच नाही ..


दुखं तेवढी सगळी सोबत असतात,
सुख मात्र थांबतच नाही...

अश्यावेळी समजवायला आपल्याला सगळे जण,
समजून मात्र कोणीच घेत नाही ...

वाटते मग देव तरी समजून घेईल आपल्याला,
कारण भावना आपल्या काही वाईट नाही ..

मग विटून जाते मन आपले देवाकडे प्रार्थना करून करून,
पण मन आपले त्यालाही कधी कध्धीच कळत नाही...

विसरून जावे म्हणतो आता सगळे ,
पण आठवण आल्याशिवाय काही रहात  नाही ...

कारण माझीच माणसे आहेत ती सगळी ,
मी त्यांचा आणि ती माणसे माझी ,
या शिवाय माझ्या मनाला दुसरं काहीच कळत  नाही ...

मोजकेच ठरलेले असते ना आयुष्य हे आपले 
आणि त्यातही एकमेकांचे मन दुखावून काहीच उपयोग नाही ...

परिस्थिती मुळेच माणूस घडत किवा बिघडत असतो ,
त्यामुळेच निर्माण होत असते त्याची चांगली किंवा वाईट ओळख,
म्हणूनच आता असे वाटते कि जे काही घडत आहे त्यात कोणाचा काही दोष नाही ...

आपले दुखं आपणच सांभाळावे आता,
आणि दुसरयाचे दुखं हि घ्यावे वाटून आपण,
मिळाले सुख तर त्यातूनच मिळेल,
कारण दूसरा कोणता आता मार्गच नाही ...

संपून जाईल लवकरच सगळे काही,
ना सुख उरेल ना दुखं,
संपण्यासाठीच हे सर्व,
आणि उरण्यासाठी काहीच नाही ....
काहीच नाही ......