Sunday, July 24, 2016

पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो.

खरं सांगायचं तर.....
आज-काल मैत्री करायची देखील खुप भीती वाटते
कारण....कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते ।

बांधलेते धागे मैत्रीचे मग,
सहजा-सहजी तुटत नाहीत ।

भावनांचे पीळ त्या नात्यातले,
काही केल्या सुटत नाहीत ।

जरी सुटले पीळ तुटले धागे
तरी ते जखमा देऊन जातात ।

जखमा त्या डोळ्यांत अपुल्या,
ओलावा ठेऊन जातात ।

ओलावा त्या डोळ्यांतला,
लपवू पाहता लपत नाही ।

डोळ्यांची मिटली झापडे तरी,
थेंब खाली.. पडल्या वाचून राहत नाही ।

आणि मग...!
का केली मैत्री ही अशी...?
हा प्रश्न मला सतावत राहतो ।

पण मी मात्र सदैव असाच,
मैत्री प्रत्येकाशी करत राहतो.

No comments:

Post a Comment