खरं सांगायचं तर.....
आज-काल मैत्री करायची देखील खुप भीती वाटते
कारण....कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते ।
बांधलेते धागे मैत्रीचे मग,
सहजा-सहजी तुटत नाहीत ।
भावनांचे पीळ त्या नात्यातले,
काही केल्या सुटत नाहीत ।
जरी सुटले पीळ तुटले धागे
तरी ते जखमा देऊन जातात ।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या,
ओलावा ठेऊन जातात ।
ओलावा त्या डोळ्यांतला,
लपवू पाहता लपत नाही ।
डोळ्यांची मिटली झापडे तरी,
थेंब खाली.. पडल्या वाचून राहत नाही ।
आणि मग...!
का केली मैत्री ही अशी...?
हा प्रश्न मला सतावत राहतो ।
पण मी मात्र सदैव असाच,
मैत्री प्रत्येकाशी करत राहतो.
No comments:
Post a Comment