Thursday, December 8, 2016

तुझे नी माझे नाते आहे तरी कसे?

तुझे नी माझे नाते आहे तरी कसे?
यात आहे मैत्रीचा गोडवा आणि प्रेमही दिसे.
फक्त तुझ्याकडूनच का आहे नकार
माझ्याकडून तर नेहमी होकारच असे
तुझे नी माझे नाते आहे तरी कसे?


तुला वाटे ही मैत्री, मला वाटे प्रेम.
आपल्या दोघांचेही विचार का गं नाहीत सेम.
बोलण्यात तुझ्या नेहमी एक वेगळीच काळजी दिसे,
तुझे नी माझे नाते आहे तरी कसे?


तुला फक्त मैत्रीच का दिसे माझ्यात?
माझे तर पुर्ण विश्वच आहे तुझ्यात.
करुन तुझ्यावर प्रेम मी चूक तर केली नसे,
तुझे नी माझे नाते आहे तरी कसे?


तुच आहेस माझी प्रेयसी, असेल मी तुझा मित्र,
का झाले असावे आपले नाते एवढे विचित्र.
नसेल मी मनात तुझ्या, तु नेहमीच माझ्या हृदयात वसे
तुझे नी माझे नाते आहे तरी कसे?

Tuesday, September 20, 2016

माझं मैत्रीतलं प्रेम....

माझं मैत्रीतलं #प्रेम....
प्रेम आणि मैत्री ही अशी दोन नाती आहेत की त्यांना कसलीचं बंधन नाहीत...नियम नाहीत...ना कुणाचा जोर ना जबरदस्ती... . कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते... अन कोणी मनात शिरलं की प्रेम
          आज सहज मनात आलं की काहीतरी लिहायचं ....पण नक्की विषय काय निवडायचं ते सुचत नव्हतं .... मग मित्र-मैत्रिणींची आठवण झाली मग ते कॉलेजचे दिवस... तो "timepass ".... ते मैत्रीतलं प्रेम... सगळं कसं डोळ्यासमोर येऊ लागलं
          सुरुवातीला अनोळखी असलेल्याशी हळूहळू ओळख होते आणि मग आपल्या मैत्रीचा प्रवास सुरू होतो. अनेक नवनवीन मित्र - मैत्रिणी या प्रवासात मिळतात. काही सोबत राहतात काही निघून जातात पण सर्वजण शेवटपर्यंत आठवणीत राहतात .... त्यातच एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण "खास" बनते. एखादी मुलगी आपल्याला "खास #मैत्रिण" म्हणुन आवडू लागते आणि मग तीच मुलगी आपल्याला परफेक्ट "प्रेयसी" वाटू लागते
         एक मैत्रिण असताना बाकी मुलीँशी तुमची मैत्री तिला खटकत नसेलही पण प्रेयसी झाल्यावर आपल्या प्रियकराने फक्त आपल्यासोबतच राहावे ही भावना वाढीस लागते. आता तिच्या स्वभावातील या बदलाला एक बंधन म्हणुन न घेता ते तिचे आपल्यावरील जिवापाड प्रेम म्हणुन स्वीकारतो तोच मुलगा ते नाते टिकवु शकतो.

Wednesday, August 17, 2016

---|| नाते भावा बहिणीचे ||---


         बहीण-भावास दरवर्षी प्रतीक्षा असते ती श्रावणमासात येणार्‍या राखी पौर्णिमेची. भावासाठी खास त्याची आवड लक्षात घेऊन बहिणी राखी निवडतात. बहिणीचे लग्न होऊन ती दूर रहात असेल किंवा भाऊ शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने घरापासून दूर असेल तर राखी वेळेवर पोहचायला हवी यासाठी तिची धडपड सुरू असते. भावाचेही तसेच. आपल्या लाडक्या बहिणीसाठी यावर्षी काय भेट घ्यायची याच्या विचारात तो सतत असतो. त्यासाठी दुकाने पालथी घालातो. 
सर्व आटापिटा झाल्यावर मग तो भाग्याचा दिवस उजाडतो. सकाळीच उठून झरझर सर्व कामे आटोपली जातात. बहिणसडारांगोळी घालते. आई गोड-धोड करते. संपूर्ण वातावरण प्रसन्नता व उत्साहाने भारलेले असते. 
          श्रावणातल्या निर्सगाच्या किमयेने नटलेल्यासृष्टीचे चैतन्य ओसंडून वाहणार्‍या महिन्यात बहीण-भावांचा हा पवित्र सण येतो. या दोघांच्या नात्यातील गहिवर या दिवशी खऱ्या अर्थाने व्यक्त होतो. वास्तविक लहानाचे मोठे होईपर्यंत भांडण,खोड्याखेळणंबागडणंशाळाअभ्यास सर्व एकत्रच होत होते. हे सगळे शब्दातीत असते. 
         या दिवशी मात्र हे व्यक्त केले जाते. मात्र तेही आगळ्या पद्धतीने. सकाळी सकाळी चंदनाच्या साबणाने आंघोळ करून भावाला रांगोळी घातलेल्या पाटावर बसवले जाते. बहिण त्याला ओवाळते. आपल्या हाताने रेशमी सुताचा धागा असलेली राखी त्याला बांधते. या मांगल्याच्या क्षणी मनात उत्पन्न होणारे भाव फक्त बहिण- भाऊच जाणू शकतात.भाऊ आपण आणलेली भेट बहिणीस देतो. 
          बहिण-भावाचे नातेच तसे आहे विश्वासआदरत्यागाच्या पायावर उभे असलेले. बहिण ओवाळते त्यावेळी दोघांमध्येही मूक संवाद सुरू असतो. बहिण म्हणत असतेमाझ्या भावा मी तुझ्यावर किती माया करते. बहीण भावास यश़कीर्ती चिंतित असते. माझा भाऊ कर्तृत्ववान व सामर्थ्यवान व्हावा अशीच तिची मनोमन इच्छा असते. तर भाऊ म्हणत असतोतू काळजी करू नको. अडचण व संकटसमयी धावून येणार तोच खरा भाऊ! तुझा भाऊसुद्धा अशा प्रसंगी नक्की धावून येईल. 
          बहीण- भाऊ दूर असले तर बहिण फोन करून राखी मिळाली काम्हणून विचारायला कधीच विसरणार नाही. तोपर्यंततिला चैन पडत नाही. भाऊही बहिणीच्या राखीची चातकाप्रमाणे वाट बघत असतो. राखी घेऊन येणार्‍या पोस्टमनला तो शतशः: धन्यवाद देत असतो. राखीचा लिफाफा हातात पडल्यावरचा आनंद जग जिंकल्यासारखाच असतो. आणि बहिणीने पाठविलेली राखी रक्षाबंधनाच्या दिवशी मनगटावर मिरवण्यातली ऐट काही औरच असते. 
       दूर असल्यामुळे प्रत्यक्ष भेट होत नसली तरी बहिणीची राखी व भावाने पाठवलेला राखी मिळाल्याचा संदेश यातूनच त्यांचा संवाद घडत असतो. प्रिय ताई… किंवा छोटी छकुली… तुझी राखी मिळाली.. खूप आनंद झाला… एवढ्या ओळी त्यांच्यासाठी पुरेशा असतात.

Sunday, July 24, 2016

पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो.

खरं सांगायचं तर.....
आज-काल मैत्री करायची देखील खुप भीती वाटते
कारण....कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते ।

बांधलेते धागे मैत्रीचे मग,
सहजा-सहजी तुटत नाहीत ।

भावनांचे पीळ त्या नात्यातले,
काही केल्या सुटत नाहीत ।

जरी सुटले पीळ तुटले धागे
तरी ते जखमा देऊन जातात ।

जखमा त्या डोळ्यांत अपुल्या,
ओलावा ठेऊन जातात ।

ओलावा त्या डोळ्यांतला,
लपवू पाहता लपत नाही ।

डोळ्यांची मिटली झापडे तरी,
थेंब खाली.. पडल्या वाचून राहत नाही ।

आणि मग...!
का केली मैत्री ही अशी...?
हा प्रश्न मला सतावत राहतो ।

पण मी मात्र सदैव असाच,
मैत्री प्रत्येकाशी करत राहतो.

Wednesday, June 22, 2016

नया प्यार है, नया इंतजार...!

नया प्यार है, नया इंतजार...! 
            'प्रेम' हा शब्द जरी दोन अक्षरी असला तरी त्याच्या अर्थाची व्याप्ती फार मोठी आहे. 'प्रेम काय आहे' या प्रश्नाच उत्तर शोधताना 'प्यार दोस्ती है' अस सोप्प उत्तर देणारा 'कुछ कुछ होता है' मधला शाहरुख खान आठवल्याशिवाय राहत नाही. मैत्रीत प्रेम असते पण प्रेमात मैत्री आवश्यकच आहे का...? मैत्रीशिवाय प्रेम सफल होऊ शकत नाही का...?? आणि जर का प्रेमामध्ये मैत्री असणे जरुरी असेल तर मग सर्वात खास मैत्रीणीलाच प्रेयसी बनवायला काय हरकत आहे...??? प्रेमाची गुंतागुंत सोडवताना असे नानाविध प्रश्न निर्माण होत राहतात. त्यांची उत्तरे अनेकदा सापडतच नाहीत.
           'मैत्रीण' आणि 'प्रेयसी' ही खर तर दोन वेगवेगळी नाती...! निखळ मैत्री ही पाण्यासारखी निर्मळ असते. त्यात वासनेचा कोणताही गंध नसतो परंतु प्रेयसीला पर्याय नसतो. सरळमार्गी पुरुष एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलींशी मैत्री ठेवु शकतो पण प्रेयसीची जागा कोणा एकालाच देता येते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला पर्याय मिळत नसतो आणि ती गोष्ट जर दस्तरखुद्द प्रेम असेल तर मग नाहीच नाही. बुट, चपला, कपडे या गोष्टी आपल्याला हव्या तशा मिळतात. जर मिळाल्याच नाहीत तर आपण त्या हव्या तशा तयार करुन घेऊ शकतो पण प्रेमाच तस नसत. प्रेमाच्या बाबतीत आणखी एक सांगितल जात की ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच्याशीच सर्वात जास्त भांडतो. ज्या माणसाने आपल्या आयुष्यातुन कधीही निघुन जावु नये किंवा जो माणुस आपल्या आयुष्यातुन निघुन गेला तर आपल्याला खुप त्रास होईल अस वाटत... आपल्याला जाणवत... त्याच्याशीच आपण खुप भांडतो. पण भांडल्याने नाती टिकतात का...? नक्कीच नाही...! नात टिकण्यासाठी दोन्ही बाजुला प्रेमाच्या ओलाव्याची गरज असते. दोघांपैकी एकटा कितीही प्रेम करत असेल, त्याची नात टिकवायची मनोमन इच्छा असली तरी तो त्या एकतर्फी नात्यात अपयशीच ठरतो. समोरच्या व्यक्तीने नात तोडायच नक्की केल असेल तर तिला निर्णय घेण्यापासुन पराव्रुत्त करणे चुकीचे ठरते. भांडण करुन अथवा जबरदस्तीने नात टिकेलही पण प्रेम नाही. निसर्गनियमानुसार साप एका ठराविक कालावधीनंतर कात टाकतो. नात्यांचही तसच आहे. दोघांमधील भांडणांनी एक ठराविक मर्यादा ओलांडली की त्या भांडणांचे वादात रुपांतर होण्याअगोदर ते नात कितीही प्रिय असल तरी तोडावच लागत. बांधीलकी आहे म्हणुन नात तसच जपत बसायच का...? की पटत नसेल तर वेगळ होऊन पुढे जायच...?? या द्विधा मनस्थितीत आपण नेहमी वावरत असतो. मन आणि बुद्धी या वादात बुद्धीला महत्व द्यायच म्हटल तरी प्रेमात मनाच कोणीच ऐकत नाही. आता माझ्याकडची सायकल कधीही पंक्चर होऊ शकते. अगदी तसच माझ प्रेमही कधीतरी पंक्चर होऊ शकत. ब्रेक-अप करण्यासाठी म्हणुन जगात कोणीच प्रेम करत नाही ना…! पण मग त्या पायरीपर्यँत एखाद नात पोहोचल असेल तर मग आयुष्यच संपल्यासारख वाटत. कुठेतरी खचल्यासारख होत. आयुष्यातील अत्यंत महत्वाची, एकमेकांवर तुटुन प्रेम करायची सोन्यासारखी वर्षे भांडण्यात वाया जातात. पण मग नात तोडुन वेगळ होण्यापेक्षा प्रेयसीला पुढे जाऊ देत आपुलकी तशीच ठेवुन वेगळ होण्यात काय चुक आहे...? यदाकदाचित पुढे जाऊन समोरच्याला त्याची चुक समजली, पश्चाताप झाला आणि निर्णय बदलला तर प्रेमाची गाडी पुन्हा रुळावर आणताही येते. किंबहुना तशी धुसर शक्यता तरी नक्कीच दिसत राहते. पण केव्हाकेव्हा ही धुसर शक्यताच आयुष्यातला सर्वात मोठा अडथळा बनते. 'ती पुन्हा परत आली तर...' या शक्यतेपायी आपल मन दुस-या कोणा व्यक्तीवर प्रेम करण्यास राजी होत नाही. बहुतांश वेळा 'ती' दुस-याबरोबर संसार थाटुन मोकळी होते. इकडे तिची वाट बघत आपण चांगल्या-चांगल्या स्थळांना नकार देतो, अशातच उमेदीची वर्षे निघुन जातात आणि शेवटी हाती पडतो तो एकाकीपणा...! मला वाटत आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर हा एकाकीपणा नको असेल तर नात्यामध्ये एकमेकांच पटत नसताना योग्य वेळी वेगळ होण्याचा निर्णय घेणे केव्हाही चांगले...! जर तुम्ही तुमच्यातल नात आहे तसच ओढत राहिलात तर नात जीवंत असल्याचा आभास होईल, पण सहवास मात्र होणार नाही.
                शेवटी प्रेम, प्रेम, प्रेम म्हणजे नक्की काय असत...? आपल्याला कोणीतरी हव असत, आपला हात हातात धरणार... आपली स्वप्न शेअर करुन त्याच स्वप्नात जगणार...! माणुस हा तसा नेहमी एकटाच असला तरी त्याला सोबतची गरज असते. जिला मनातली सगळी स्पंदने समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमजेल, महत्वाकांक्षा पेलेल. म्हणुनच प्रेम ही आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पाप, पुण्य अशा जगातील बाकीच्या गोष्टी त्या प्रेमासमोर क्षुल्लक ठरतात. प्रेम आपल्याला चांगल आयुष्य जगायला शिकवत. आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याच्या ध्यासापायी आयुष्यातील कठीणातील कठीण शिखर आपण सर करु शकतो. बाकी कोणत्याही गोष्टी मिळाल्या तरी आयुष्यात समाधान मिळत नाही कारण आपल्याला भरपुर गोष्टींचा हव्यास असतो पण प्रेम मिळाल्यावर आपण सुखी-समाधानी होतो कारण त्या प्रेमासमोर बाकीच्या गोष्टी खुपच फिक्या वाटु लागतात. प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते. जितका सहवास जास्त, तितके प्रेम जास्त...! जसे एखाद्या व्यक्तीवर ठरवुन प्रेम करता येत नाही तसेच तिच्यावर कळत-नकळत करत असलेले प्रेम देखील आपण नाकारु शकत नाही. आपले प्रेम योग्य वेळी व्यक्त होणे आवश्यक असते कारण उगाच उशीर करुन अव्यक्त राहिल्यास ती व्यक्ती कायमची गमावण्याची शक्यता दाट असते. जर समोरची व्यक्ती आपल्याकडुन कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्यावर मनापासून प्रेम करत असेल तर कोणत्याही खोट्या स्वाभिमानाला किंवा समाजाच्या भितीला बळी न पडता त्या व्यक्तीच्या प्रेमाचा स्वीकार करायला हवा. अशा वेळी मन आणि बुद्धीची सांगड होत नसल्यास एकच गोष्ट लक्षात ठेवावी की प्रत्येक वेळी बुद्धीने घेतलेला निर्णय योग्य असतोच असे नाही. जेव्हा प्रश्न भावनांच्या गुंतागुंतीचा असतो तेव्हा बुद्धीपेक्षा आपल्या मनाला जे पटेल तेच करावे. करियर, करियरच्या मागे अधाशासारखे धावुन कमावलेला पैसा आपल्याला आयुष्यात क्षणिक आनंद मिळवुन देतो पण सुख-शांती देऊ शकत नाही. खर समाधान तर आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो तिच्या नजरेतुन व्यक्त होणा-या भावनेमध्ये दडलेले असते. कितीही पैसा खर्च करुन आपण ते समाधान मिळवु शकत नाही.
               आजकाल नात्यांवर डेली सोप सिरीयलचाच प्रभाव जास्त पडलेला दिसतो. प्रेमात असताना छोटया किंवा मोठया पडद्यावरील एखादी जोडी आपल्याला आदर्श वाटु लागते आणि आपल्यातील प्रेम देखील अगदी त्याच जोडीप्रमाणे फुलत जावे, अशी भाबडी आशा वाटत राहते. दुर्देवाने पडद्यावरील जोड्या पाहणं आणि ख-या आयुष्यातील प्रेम निभावण यात जमीन आसमानाचा फरक असतो. नात हे कधीही फिल्मी असु शकत नाही. आपल नात फुलवण्यासाठी जितके शक्य असेल तितके प्रयत्न अवश्य करावे पण ते अगदी चित्रपटातील नात्याप्रमाणे आदर्शच असायला हवे हा अट्टाहास करु नये. नात आदर्श बनवण्याच्या नादात ते तुटण्याचीच शक्यता जास्त असते. काही जोडप्यांची एकमेकांमध्ये जितकी जास्त भांडण होतील तितक आपल एकमेकांवर जास्त प्रेम आहे, अशी भंपक समजुत झालेली असते. चित्रपट पाहुन असले मुर्खासारखे निष्कर्ष काढु नका. तुमच्यात सतत भांडणे होत असतील तर तुमच्या दोघांची मानसिकता पुर्णपणे विरुद्ध दिशांना जाणारी आहे आणि अशी नाती फार काळ टिकत नाहीत. अनेकदा स्वभावात साम्य नसल, अगदी परस्परविरोधी स्वभाव असले तरी काही जोडपी सुंदरपणे नात निभावुन नेतात कारण त्यांच्यात प्रेम निभावण्यासाठी लागणारे सामंजस्य असते आणि या सामंजस्यामुळेच त्यांच्यातील प्रेम उत्तरोत्तर वाढत जाते. कुठल्याही नात्यात प्रेयसीच्या मित्रावरुन किंवा प्रियकराच्या मैत्रीणीवरुन संशय घेत काही लोक विनाकरण भांडण करत स्वतःला मानसिक त्रास करुन घेतात. त्यापेक्षा अंतर्मुख होऊन अशा फालतु गोष्टींना विनाकारण महत्व देत दोघांनाही मनस्ताप करुन घेण्यापेक्षा नात्याला जास्त महत्व देणे केव्हाही चांगले. तुम्हाला तिच्या सानिध्यात आल्यावर पुर्ण समाधानी, मोकळ, सुरक्षित आणि आनंदी वाटत असेल तर तुम्ही योग्य जोडीदार निवडला आहे अस समजायला काहीच हरकत नाही. प्रेमात आपल्यासाठी आपल्या जोडीदाराने बदलाव ही अपेक्षाच करणच मुळी चुकीच असत कारण जोडीदार आहे तसा स्वीकारला जातो तेव्हा त्या नात्याचा पाया अधिक घट्ट झालेला असतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा गुणदोषांसकट केलेला स्वीकार त्या नात्याच्या खरेपणावर शिक्कामोर्तब करतो. अशावेळी ते नात आपोआप फुलत राहत. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे गुण-दोष सगळ काही माहित असत आणि त्याचमुळे प्रत्येक गोष्टीवर सामंजस्याने तोडगा काढण्यास मदत होते.एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारल्यामुळे परस्परांबाबत लागणारा आदर आपोआप मिळतो. नात्यामध्ये परस्परांबाबतची मत, जाणीवा, आचारविचार यांचा आदर राखण फार महत्वाच असत. एखाद्या प्रसंगी आपला जोडीदार कसा रिअँक्ट होईल हे ग्रुहीत धरलेल असेल तर बहुतांश वेळा तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. केवळ जोडीदारामुळे तुम्हाला तुमची स्वप्न, करिअर, प्राधान्यक्रम बदलावे लागत असतील तर तुम्ही त्या नात्यात वाहवत चालला आहात. म्हणुनच सांगतो जेव्हा तुम्हाला स्वतःला कुणासाठी बदलाव लागत नाही तेव्हा तुम्ही परमेश्वराने तुमच्यासाठी बनवलेल्या जोडीदारासोबत आहात याची खात्री बाळगावी. आयुष्यात प्रत्येकालाच ज्यांना आपल मानाव अशी माणस भेटतातच असे नाही. काही वेळा आपली माणस भेटतात पण आयुष्यभरासाठी आपली साथ न देता अर्ध्यावरच सोडुन जातात. म्हणूनच अशीच एखादी 'खास' व्यक्ती आपल्या आयुष्यात नव्याने आली असेल तर तिला ती आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे हे कधी ना कधी सांगावेच लागते.
.
              लेखाचा शेवट करताना मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटात एक सुंदर डायलाँग आठवतोय- "प्रेमाची पुढची पायरी असते ती म्हणजे लग्न...! पुर्वी देवदेवतांच्या साक्षीने, नातेवाईकांच्या सानिध्यात एक पवित्र सोहळा पार पाडला जायचा तो म्हणजे लग्न...!! त्यानंतर 'हनीमुन' नावाची एक संकल्पना असायची परंतु आताची पिढी इतकी पुढारलेली आहे की हल्ली लग्नाआधीच एकमेकांच्या खुप जवळ येऊन आपण त्या नात्यातील गोडवा घालवतोय. नात्यांची खरी मजा ती उलगडण्यात आहे. तो हनीमुनचा पहिला स्पर्श... पहिली मिठी... त्या रुममधील ते दोघे नवरा-बायको... दोघे अनोळखी असले तरी एकमेकांना समजुन घेण्याची सुरुवात लग्नानंतरच व्हायची... गर्दीतुन चालताना नकळत होणारा तो हातांचा स्पर्श... ते लाजण... वाट बघण... शिंकण्याच्या सवयीपासुन ते जेवणाच्या चवीपर्यँत एकेक गोष्ट हळुहळु समजत जायची. ती मजा आजकाल लग्नाआधीच्या मजेमुळे हरवत चाललीय. आजची पिढी नात्यांना उलगडुच देत नाहीये."
            गेली काही वर्षे प्रेमाच असच एक हळव नात उलगडण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला पण समोरच्याला 'प्रेम' या शब्दाचीच किळस वाटत असेल तिथे मी तरी काय करणार...? मी अपुरा पडलो पण प्रेम या शब्दावर माझी आजही पुर्ण श्रद्धा आहे. म्हणुनच प्रेमाचा हा स्वर्गीय अनुभव मी याच जन्मी घेऊ इच्छितो. दुनियादारीतल्या एम.के. प्रमाणे मला दुस-या जन्माची वाट नाही बघायचीय. मागच्या वेळच्या सगळ्या चुका टाळुन जिला प्रेमाचे मुल्य ठाऊक आहे अशाच मुलीशी मला प्रेम करायचय. प्रेमात मैत्री असणे आवश्यक आहे म्हणुन एखाद्या मुलीच्या प्रेमात पडुन मैत्री करण्यापेक्षा, यावेळी मला माझ्या सर्वात जवळच्या मैत्रीणीवरच प्रेम करायचय. प्रेमाच नात उलगडण्यात असणारी मजा अनुभवत हे आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगायचय.

प्रेम म्हणजे काय असतं ते....?

‪#‎प्रेम‬ म्हणजे काय???…..कुणीतरी आवडणं म्हणजे प्रेम की …कोणाच्या डोळ्यात हरउन जाणं म्हणजे प्रेम …कोणालातरी सारखं पाहत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम की …कोणालातरी विसरता न येणं म्हणजे प्रेम ….कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे प्रेम की …आपली आणि कोणाच्या तरी आवडी जुळणे म्हणजे प्रेम …कोणी स्वप्नांत येणं म्हणजे प्रेम की…कोणाच्या सहवासात … स्वप्न जगल्यासारखं वाटणं म्हणजे प्रेम …कोणावर विश्वास ठेवणे म्हणजे प्रेम की ….कोणाचातरी विश्वास कधीच न तोडणे म्हणजे प्रेम ….कुणाला माफ करणे म्हणजे प्रेम की ….कुणाची तरी उगीचच माफी मागणे म्हणजे प्रेम ….कुणाकडून काही घेणं म्हणजे प्रेम की….न मागता कोणाला काहीतरी देणं म्हणजे प्रेम ….कोणासाठीतरी रडणारं मन म्हणजे प्रेम की ….कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे प्रेम ….कोणाशिवाय मरणं म्हणजे प्रेम की …कोणासाठी जगणं म्हणजे प्रेम …
          कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की ….आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम की ….कुणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम की ….
कुणाच्या तरी सोबतीताला आनंद म्हणजेच प्रेम.....मग प्रेम म्हणजे नक्की आहे तरी काय.....?
         आपल्या मनात कुणाबद्दल तरी आकर्षण निर्माण होणं. कुणी तरी आवडू लागणं , कुणी तरी भेटावं असं वाटायला लागतं. कुणाची तरी स्वप्नं पडायला लागतात. आपल्या शरीरात आणि मनात जे बदल होतात त्यामुळे हे आकर्षण वाढू लागतं. सतत आपल्याला आवडणारी व्यक्ती, तिचं बोलणं, राहणं, तेच मनात येत राहतं. कधी-कधी तिचा स्पर्श व्हावा, तिला स्पर्श करावा, असंही वाटतं. ह्यात वाईट काही नाही. तसंच प्रत्येकाला हे होईलच असा काही नियम पण नाही.
पण आपण प्रेमात पडलोय हे कसं ओळखायचं? एखाद्याला आपण आवडतो, हे त्या व्यक्तीच्या वागण्यातून, बोलण्यातून समजतं. तिच्याशी किंवा त्याच्याशी बोलणं, त्याचा किंवा तिचा आवाज ऐकणं, स्पर्श होणं या सगळ्या गोष्टींनी आपण सुखावतो. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला भेटायला आपण आतुर होतो, तो किंवा ती नाही भेटली तर अस्वस्थ होतो, दुःखी होतो. प्रेमात पडणं आणि आपण कुणाला तरी आवडणं या खूप छान गोष्टी आहेत. महत्वाचं म्हणजे प्रेमात पडायचं तर दोघंही एकमेकांना मनापासून आवडायला पाहिजेत.
         एखाद्या मुलीला जर एखादा मुलगा आवडत नसेल तर आपण जबरदस्ती करू शकत नाही. तसंच एखाद्या मुलीने नकार दिला तर उगीचचं जेवण नको, खेळायला नको, अभ्यास नको, काम नको, मित्र नकोत असं करत बसण्यात काहीही अर्थ नाही. या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्याला कुणी पण आवडो, त्या मुलीला किंवा मुलाला जर आपण आवडत नसलो किंवा समोरच्याच्या मनात आपल्याविषयी प्रेमाच्या भावना नसतील तर आपण त्या मान्य करायला पाहिजेत आणि आपल्या भावना आपल्यापाशी ठेवल्या पाहिजेत. जबरदस्ती करून, मागे लागून, पिच्छा पुरवून कुणाचं प्रेम मिळत नसतं. तसं फक्त सिनेमात होतं. कारण सिनेमा हा माणसांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे घडवलेला असतो.
         आता समजलं का #प्रेम म्हणजे काय असतं ते....?

Monday, May 23, 2016

आस शेवटची

"हि कविता म्हणजे मुलाने मुलीकडे केलेला प्रेम प्रस्ताव आहे...
ज्याला तुम्ही 'प्रपोज ' असे हि म्हणता...
या मुलाला तीच काय उत्तर असेल याची खात्री नाही,
तरीही खूप हिम्मत करून तो आपल्या मनातला प्रेम प्रस्ताव,
तिच्या समोर या कविते मार्फत मांडत आहे...

असा प्रस्ताव तुमच्या हि वाट्याला आला असेल किंवा,
असाच प्रस्ताव मांडण्यासाठी तुम्हीही कधी मनाची
कविता केली असेल........??
या मुलाचा हा प्रेम प्रस्ताव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट,
द्वारे नक्की सांगा...
तुमच्या उत्तराची वाट बघतोय......

" आस शेवटची "
कसे दावू तुजला प्रिये...?
मन माझे वेडे...
आजही पाही अपेक्षेने...
व्याकूळ होऊन तुझ्याच कडे...
वाटे आजही उरली आहे,
ती आस कुठेतरी...
माझ्या मनातला प्रेमाचा दिवा...
त्याचा प्रकाश असेल तुझ्यात जरातरी...
माहित आहे नाही तू माझी,
न होतीस कधी, ना होशील कधी...
तरीही शेवटची आस विचारतो...
वाट चुकून अशी येशील का मनामधी...?
नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी...
जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी...
आता निरोप घेतो...
दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी....

"मी जेव्हा मरेन,
तुझ्या डोळयांत पाणी आणायचे
नाही..
माझ्या नावाने ओरडायचे, नाही..
मला मिठीत घेऊन परत ये,ना अजिबात म्हणायचे
नाही....
खुप वाट पाहीली गं तुझ्या
रिप्लायची..
मला पुन्हा आता झुरायचे
नाही...
फक्त एक फुल ठेव देहावर,माझ्या कारण....
हे फुल मला जिवंतपणी


मिळायचे नाही.....

मला आठवूनी तुझ्या भोवताली जराशी वळूनी पाहशील का???

कधी सांजवेळी मला आठवूनी तुझ्या भोवताली जराशी वळूनी पाहशील का??? माझे सोन्याचे आभाळ, माझी सोनेरी संध्याकाळ… सये माझ्या गळ्यातली सोनियाची तु माळ… असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर. मला तुझ्यात सामावून घे बाकी सर्व वजा कर…. डोळ्यांत साठलेल्या तुझ्या आठवणी रात्र ही सरता सरेना, किती दिस लोटले तुला पाहुन स्वप्नात तरी ये ना !!! असतिल लाख कृष्ण कालिंदिच्या तटाला राधेस जो मिळाला तो एकटाच उरला… शब्द सारे संपलेले सांगण्या नुरलेच काही, मौन झाले अधर आता बोलण्या हितगुज काही.. विखुरलेली स्वप्ने सारी का उगा तु जुळविशी का काळाने दिलेली भेट ह्रदयी कवटाळीशी….

Sunday, February 14, 2016

आज क्षणभर थांबाव तुझ्यासाठी

तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण आज मला खुप आठवतो.. तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझा मन मला खुप हसवतो.. तुझ ते माझ्या कड़े पाहण हळूच काहीतरी इशारे करण माझ्याकड़े बघून हसण.. अचानक नजर फिरवून लाजन
अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी...


Sunday, February 7, 2016

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना, 
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना, 
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे, 
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे, 

तू आहेस माझी स्वप्न परी, 
नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी, 
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी, 
मी मात्र तसाच राहील वार्यावरी, 

येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी, 
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी, 
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी, 
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जतुनी, 

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना, 
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना, 
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे, 
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!

Thursday, January 14, 2016

काय असेल तिचे उत्तर....पूर्ण होतील का माझ्या मनोकामना..

कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर एक चान्स दे मला तुझ्यासाठी करेल, 
जे केले नाही आजवर आंधळा झालोय तुझ्या प्रेमात 
मी कोणी सावरेल का मला स्वप्नात येते तू दिवस रात्रं 
याची चाहूल आहे का तुला, तुझी आठवण येता 
चुकतो माझ्या हृदयाचा ठोका तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये बघण्याचा 
कधी सोडत नाही मोका, असं वाटत कि तुझ्या सुंदर नयनांमध्ये
स्वतःला विसरून जाऊ, काळ्याभोर केसांमध्ये 
स्वतःला गुंतवून घेऊ का, कसे, केव्हा सांगू मी 
किती प्रेम करतो तुझ्यावर भीती वाटते कि काय असेल तिचे उत्तर असा विचार येतो माझ्या मनात असतील का तिला माझ्या बद्दल भावना आणि विचारातच मी अडकून जातो कधी पूर्ण होतील का माझ्या मनोकामना...

हम आपके बिना जी नही सकते

अपने दिल की बात उनसे कह नहीं सकते, 
बिन कहे भी जी नहीं सकते, 
ऐ खुदा! ऐसी तकदीर बना, 
कि वो खुद हम से आकर कहे, 
हम आपके बिना जी नही सकते.

Wednesday, January 13, 2016

माझे मलाच कळले नव्हतं.

ओंजळीतले क्षण केवळ प्रेमाचे होते
नकळत आवड्लेलीस तू माझे मलाच कळले नव्हते..
माळले प्रत्येक फुल सुगंध मलाच देत होते
शेअर केले सारे क्षण फक्त प्रेमानेच भारले होते..
डोळ्यात पाणी तुझ्या मन माझे रडत होते
हसलीस जेव्हा तू सारे जीवन हसले होते..
अवचित आवडलेली तू जीवन एक स्वप्नः होते
रात राणी कधी बहरली माझे मलाच कळले नव्हतं.

एक दिवस असा येयील

एक दिवस असा येयील तुला माझी उणीव भासेल , आणि जिथे पाहशील तिथे माझाच चेहरादिसेल ... येणारा प्रत्येक क्षण तुला गेल्या क्षणाची आठवण करून देयील , 
आणि मला झालेल्या दुखाची तुला जाणीवहोयील ... तुझे डोळे सतत माझ्या वाटेकडे पाहतील , आणि वाटेवर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत तुझे अश्रू हि वाहतील ..... तुझा तो उदास चेहरा पाहून तेव्हा तू रडशील , आणि जेथे पाहशील तेथे माझाच चेहरादिसेल ..... पण......पण..... ... ज्या वेळी तुझे मन माझ्याकडे धावेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेल...

विसरु नकोस तू मला

इतकेच सांगणे आहे तुला विसरु नकोस तू मला, नाहीं जमल फुलायाला हरकत नाही, कोमेजुन मात्र जावू नकोस, माझ्या प्रीत फुला, इतकेच सांगणे आहे तुला, विसरु नकोस तू मला, नाही जमणार परत कधी भेटायला, नाही जमणार एकमेकांना पहायला, हरकत नाही इतकेच सांगणे आहे तुला, टालू नकोस तू मला, शेवटचच आहे हे भेटण घडणारच आहे, ह्रुदयाचे तीळ तीळ तुटण , नियतीनेच ठरविले आहे आपल्याला असे लुटण , इतकेच सांगणे आहे तुला जपुन ठेव आठवणीना, नाही नियमितपणे त्यात रमता आले हरक़त नाही पण विसरु नकोस तू मला

हवी तुझी साथ मला...

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते फक्त कोणाची तरी साथ असावी लागते... :माझे ही काहीसे तसेच काही गोष्टी पूर्ण आहेत आणि बऱ्याच गोष्टी अधूऱ्याच आहेत... :आयुष्य अपूर्ण असतानाच जगावे म्हणतात पूर्ण होईल ते जीवन कसले...! त्यामुळ मी स्वतः अजून अधूराच राहिलोय... :जीवनाच्या या एकमार्गी वाटेवर मी एकटाच चालत आहे मलाही कोणाची तरी सोबत हवी आहे... :शेवट पर्यंत आयुष्याची होशील का सोबतीण माझी..? लढवण्यासाठी हा जीवनकिल्ला हवी तुझी साथ मला...

अन प्रेम करायच राहुनच गेलं...

अन प्रेम करायच राहुनच गेलं... तिच्या घरच्यांशी असनारी जवळीक, प्रेमाच्या आड येउन बसली.. जीव तिच्यावर जडुनही, मनाला मुरड आम्ही घातली.. मनं मारायचं कामच आम्ही उभ्या आयुष्यात केलं, अन प्रेम करायच राहुनच गेलं... तिचा होकार असतानाही, तिच्या घरच्यांचाच विचार केला.. सारा विचार करुन, तिला नकारचं दिला.. उपकारांच्या ओझ्याखाली, त्यांनी आम्हाला खोलवर गाडलं.. अन प्रेम करायच राहुनच गेलं... एक नाते जोडावे कि चार नाती तोडावी.. हे आम्हाला कधी, समजलेच नाही.. झाडाचा बुंधा सोडून फांद्याशी नाते जोडने, जमलेही नाही.. फुलण्या आधिच कळ्यांना (प्रेमाला) कोमेजताना पाहिलं, अन प्रेम करायच राहुनच गेलं..